Mumbai Water Cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट? ७ धरणांत फक्त इतकाच पाणीसाठा!

0
21
Mumbai Water Cut : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट? ७ धरणांत फक्त इतकाच पाणीसाठा!


मिळालेल्या माहितीनुसार,मुंबई शहराला व उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात केवळ १९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईत पाणीटंचाईची भीती व्यक्त होत आहे. मात्र,महापालिकेकडूनअद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, भातसा, तानसा, तुळशी आणि विहार या ७ धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. यातील अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा हे तलाव आटले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईतला पाणीपुरवठा अपुरा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून कोणत्याही क्षणी पाणीकपातीचा निर्णय महापालिका घेऊ शकते.



Source link