
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) शहरातील ज्या भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, अशा भागांतील यादी जाहीर केली. अशा भागांत गुंतवणूक करण्याचे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. मुंबईत दरवर्षी ज्या भागात पाणी साचते, त्या भागांच्या तुलनेत प्रॉपर्टी व्हॅल्यू आणि रेंटल व्हॅल्यू दोन्ही १० ते २० टक्क्यांनी कमी होतात. याउलट ज्या भागांत पाणी साचत नाही, तेथील मालमत्तेची किंमत आणि भाडे वाढण्याची शक्यता आहे.







