
Maharashtra Rain Alert : मुंबई कोकण किनारपट्टीसह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांत पावसाचं प्रमाण वाढल्याने नद्या पात्राबाहेर गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे रस्ते पाण्याखाली जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रविवारी व सोमवारी दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने मंगळवारी (९ जुलै) रोजी सुद्धा अतिवृष्टी होणार असल्याच्या इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई,नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.







