
Mumbai Pune Expressway traffic news : ख्रिसमसमुळे आणि सलग आलेल्या सुट्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या तब्बल १० किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. तसेच अनेक वाहने ही रस्त्यावरच बंद पडली होती. ही वाहतूक कोंडी सोडवतांना पोलिसांची दमछाक झाली होती. आता पुन्हा नवीन वर्षानिमित्त व सलग सुट्ट्या आल्यामुळे या मार्गवारील वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांनी अवजड वाहन चालकांना दुपारी १२ नंतर प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







