
Latest News in Mumbai Today Live पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून मदतकार्य सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांसाठी विशेष विमानाची सोय केली. राज्य सरकारने ‘इंडिगो’ आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती, त्यातून १८४ पर्यटक मुंबईत दाखल झाले. दरम्यान, आणखी २३२ प्रवाशांसाठी आज, शुक्रवारी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. मुंबईशी संबंधित विविध घडामोडींची माहिती या Blog च्या माध्यमातून घेता येईल…







