
मिळालेल्या माहितीनुसार, अमान सय्यद (वय, १९) आणि अर्चना पगारे (वय, २०) अशी मृतांची नावे आहेत. अमान आणि अर्चना हे दोघेही ठाणे आणि डोंबिवलीमध्ये नोकरी करायचे. शनिवारी दोघेही कामावरून घरी परतत असताना खारेगाव टोल जवळ भरधाव कंटनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कंटेनरमधील लोखंडी रॉड त्यांच्या शरीरात घुसले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालक जितेंद्रकुमार यादव (वय, २८) याला अटक केली. तसेच हा अपघात कशामुळे झाला? त्यामागचे खरे कारणही शोधले जात आहे. याशिवाय, कंटेनर चालकाने मद्यपान केले होते का? याचाही तपास सुरू आहे.







