
राज्यात आतापर्यंत कुठे-कुठे मतदान?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ५६.६६ टक्के मतदान झाले. परभणीत ५३.७९ टक्के मतदान झाले. तर, नांदेडमध्ये ५२.४७ टक्के, अकोल्यात ५२.४९ टक्के, यवतमाळ वाशिममध्ये ५४.०४ टक्के, अमरावतीत ५४.५०.७६ टक्के, हिंगोलीत ५२.०३ टक्के आणि बुलडाण्यात ५१.२४ टक्के मतदान झाले. तर, पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर या पाच जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले. या जागांवर एकूण ६३.७० टक्के मतदान झाले. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.