
Mumbai Goa Highway : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. रस्ते तसेच रेल्वेमार्गे चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास कमी करण्यासाठी सरकारकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केल्यानंतर हे विधान केले.