
Mumbai Boat Accident: मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ६६ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बोट गेट ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जात असताना ही दुर्घटना घटना घडली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.







