
Tripathi Family Saved in Mumbai Boat Accident: मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे बुधवारी संध्याकाळी प्रवासी बोट समुद्रात बुडल्याने आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतून १०० हून अधिक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मात्र, यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे अनेक कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना एका लहान मुलाच्या हट्टापायी अख्ख कुटुंब बचावले. नेमके असे काय घडले की, संबंधित कुटुंब बोटीत बसायला जात असताना त्यांना माघारी फिरावे लागले.