
मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ नौदलाची स्पीड बोट आणि प्रवासी बोट यांच्यात भीषण अपघात झाला. या घटनेत एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० नागरिक आणि तीन नौदलाच्य जवानाचा समावेश आहे. तर, १०१ जणांना वाचवण्यात यश आले. नीलकमल नावाची बोट प्रवाशांना घेऊन प्रसिद्ध पर्यटनस्थळ एलिफंटा बेटाकडे जात असताना दुपारी चारच्या सुमारास नौदलाच्या स्पीड बोटने त्यांना धडक दिली. या घटनेचा कथित व्हिडिओही व्हायरल झाला आहे.





