
Mumbai Accident: मुंबईतील बोरीवली परिसरात भरधाव ऑटो रिक्षाच्या धडकेत एका ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, बोरिवली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर रिक्षा चालकाची जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. मुंबई शहरात आठवड्याभरात तीन जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.





