
उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीषक, तहसीलदार या संवर्गातील जागांसाठी ही भरती राबवली गेली. मुलाखतीनंतर त्याची अंतिम यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेत विनायक पाटील राज्यात पहिला आहे. विनायक पाटीलला ६२२ गुण मिळाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनंजय पाटीलला ६०८ गुण मिळाले. पूजा वंजारी राज्यात मुलींमध्ये पहिली आली आहे. तिला ५७०.२५ गुण मिळाले आहेत.






