
विधानपरिषदेत बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातून दररोज ७० महिला गायब होत आहे, असा आपण समज करून घेत आहोत. महाराष्ट्रात महिला आणि मुली सुरक्षित नाही, हे खरं नाहीय. अनेकदा जेष्ठ महिला घर सोडून निघून जातात. काही महिलांची वैयक्तिक आणि अन्य कारणं असतात. त्यावेळी पोलीस त्यांचा शोध घेऊन त्यांना परत घरी आणतात, अशा घटनांमध्ये ७२ तासांच्या आत एफआयआर करावी लागते, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे. तसं झालं नाही तर अपहरणाची केस समजून त्याची चौकशी करावी लागत असल्याचं फडणवीसांनी विधानपरिषदेत सांगितलं आहे. देशातील अन्य शहरांच्या तुलनेत महिलांना मुंबईत अधिक सुरक्षित वाटतं. असंख्य महिला नोकरीच्या किंवा अन्य कारणांच्या निमित्ताने रात्री-अपरात्री मुंबईत प्रवास करत असतात, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.




