
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी, ७ मे रोजी बिहारसह देशभरात नागरी संरक्षण मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश दिले आहेत. बिहारमधील पाटणा, पूर्णिया, कटिहार, बेगूसराय, अररिया आणि किशनगंज या सहा जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. या काळात सायंकाळी 7 ते 7.10 वाजेपर्यंत ब्लॅकआऊट राहणार आहे. दोन मिनिटे सायरन वाजतील, त्यानंतर वीज पुरवठा खंडित होईल. गाडीने जात असाल तर बाजूला थांबा, मोबाईल फोनही वापरू नका, इन्व्हर्टरचा लाईट चालवू नका. राज्य सरकारने सर्व जिल्हा प्रशासनाला याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत.