
सीएम म्हणाले, “लोक आश्रयासाठी म्यानमारमधून पळून आमच्या देशात येत आहेत आणि आम्ही त्यांना मानवतेच्या आधारावर मदत करत आहोत. म्यानमारचे सैनिक येतच राहतात. ते आमच्याकडे आश्रय मागत आहेत. याआधी आम्ही त्यांना विमानानं परत पाठवलं आहे. आतापर्यंत ४५० सैनिकांना परत पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.








