
आता ही केवळ अक्षय कुमार आणि त्याच्या चाहत्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट अतिशय धाडसी कोल इंजिनीअर जसवंत गिल यांच्या आयुष्यावर आधारित आहे. जसवंत गिल यांनी १९८९मध्ये कोळसा खाणीत अडकलेल्या ६५ मजुरांचे प्राण वाचवले होते. आपल्या हिंमतीने आणि धाडसाने त्यांनी इतिहासात आपले नाव कोरले. या शौर्याबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अक्षय कुमार या चित्रपटात जसवंत गिल यांच्या भूमिकेत दिसला आहे. अक्षयसोबत या चित्रपटात परिणीती चोप्रा, रवी किशन आणि कुमुद मिश्रासारखे कलाकारही दिसले आहेत.








