
एक अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. अलिबागच्या जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी विधीमंडळात आवाज उठवला होता. जनहिताच्या मुद्द्यांवर त्या सभागृहात सत्ताधाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरत. एकेकाळी राज्यभरात पसरलेला शेतकरी कामगार पक्ष (Shetkari Kamgar Paksha) कालांतरानं प्रभावहीन झाला. मात्र, रायगड जिल्ह्यात शेकापची ताकद आजही टिकून आहे. त्यात मीनाक्षी पाटील यांचा मोठा वाटा होता. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.






