
अभिनेते मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले की, ‘चांगलं की वाईट… अनिरुद्ध देशमुख ज्यावेळेला असा स्टँड घेतो त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये पण असा विचार येतो की, आता या माणसाचं काय करायचं, माणूस इतका चांगला पण वागू शकतो?, असा प्रश्न आल्या शिवाय राहत नाही. अनिरुद्धच नाव इतकं बदनाम झालं आहे, की तो जे करेल ते चुकीचं आहे, असं मनामध्ये भावना येणं साहजिक आहे. काही काही परिस्थितीमध्ये हा माणूस अगदी हिरो सारखाच वागतो, सरप्राईज करतो सगळ्यांना, मी पण ज्या वेळेला स्क्रिप्ट वाचतो त्यावेळेला नकळत माझ्या चेहऱ्यावर एक हसू येतं आणि मन भरून येतं, डोळे सुद्धा भरून येतात. मनातल्या मनात नमिता वर्तक हिला थँक यू सुद्धा म्हणत असतो. पण, खरंच आहे किती वाईट माणूस असला, तरी काही काही बाबतीत माणसाने ठाम भूमिका घ्यायलाच हवी. योग्य माणसांना साथ द्यायलाच हवी.’








