
पाच वर्षात ८ लाख घरे उभारणार –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेला चालना देण्यात आली आहे. ५ वर्षात आठ लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. काही घरे दिल्यानंतर आम्ही तेथे भेट देऊन त्यांची गुणवत्ता तपासणार आहोत. कोकण मंडळात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. सध्याच्या लॉटरीमध्ये २ हजार १४७ सदनिकांचा समावेश आहे. यात २० टक्के सर्वसमावेशक योजनेमधील ५९४ सदनिका (ठाणे व कल्याण), म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेतील ७२८ सदनिका (ठाणे, कल्याण, रत्नागिरी), १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेतील ८२५ सदनिका (डोंबिवली) यांचा समावेश आहे. या सदनिकांसाठी एकूण ३१ हजार ४६५ अर्ज प्राप्त झाले. या सदनिकांचे चटई क्षेत्रफळ २३ चौरस मीटर ते ५० चौरस मीटर दरम्यान असून सदनिकांची सरासरी किंमत रुपये १० लाख ते ३५ लाखापर्यंत आहे.