
वेदांत आणि अमुल्या या जोडीची भांडणं आणि त्यातून त्यांच्यात फुललेले प्रेम अशी या मालिकेची संकल्पना आहे. मात्र, या मालिकेला आता फारसा टीआरपी मिळत नसल्याचे समोर आले आहे. तर, टीआरपी नाही म्हणजे प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली असा निष्कर्ष काढला जातो. असंच काहीसं आता या मालिकेसोबत घडलं आहे. टेलिव्हिजन अपडेट्स देणाऱ्या एका सूत्राच्या माहितीनुसार, ही मालिका लवकरच बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अद्याप यावर मालिकेतील कलाकारांकडून किंवा वाहिनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.







