
या फोटोवर अश्विनी हिने लिहिले की, ‘एक मराठा लाख मराठा…आणि पाटील साहेबांना काही झाले तर सरकारने त्याचीही तयारी ठेवा मग. आता आमच्यावर नुसते लाठीचार्ज करून उपयोग होणार नाही’. तिचा हा धमकीवजा इशारा आता चर्चेचा विषय ठरला आहे. साताऱ्यात होणाऱ्या आंदोलनाला अश्विनीने आपला पाठिंबा दिला आहे. अश्विनीसोबत अभिनेते किरण माने यांनी देखील या आंदोलन पाठिंबा दिला आहे. साताऱ्यात पार पडलेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. यासोबतच त्यांनी आता मनोज पाटील-जरांगे यांना एक आवाहन केलं आहे. ‘जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर असं पूर्वी घडणं सहजशक्य होतं, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पहाणार्या व्यवस्थेला तो धाक ‘दाखवण्याचं’ महान कार्य तुम्ही करताहात ! तब्येतीला सांभाळा. आम्हाला तुमची गरज आहे’ , असं त्यांनी म्हटलं आहे.







