
विदर्भात मिळतं, मग मराठवाड्यात का नाही?- जरांगे पाटील
विदर्भातील कुणबी मराठ्यांना आरक्षण मिळतं, मग मराठवाड्यातील मराठ्यांना का मिळत नाही?, आरक्षण देणं हे सरकारच्या हातात आहे. सरकारचं ऐकून आम्ही अनेकदा आंदोलनं मागे घेतलेली आहे. मला कुणालाही दुखवायचं नाहीय. कुणालाही काही न बोलता मी शांततेत आंदोलन करणार आहे. आरक्षणाचा जीआर घेवून या, मी तातडीने उपोषण सोडेन, असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.






