
‘सध्या आरक्षणाच्या नावानं फक्त पोकळ बैठकांचं सत्र चालू आहे, असं दिसतं. यातून कोणताही मार्ग निघत नाही. आरक्षण कसं देणार, किती कालमर्यादेत देणार याचा मार्गही सांगितला जात नाही. सर्वपक्षीय लोक मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, बैठकांना येतात, पण मार्ग काय काढायचा ते सांगत नाहीत. आरक्षण मिळवून देण्यापेक्षा प्रत्येकाला आपापली व्होटबँक सांभाळणं अधिक महत्त्वाचं वाटतं. त्यामुळं आजच्या बैठकीस मी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. समाज आता अशा बैठकांना भूलणार नाही, आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.




