
नुकताच ‘आदिपुरुष’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. या चित्रपटातील काही संवादांना विरोध होऊ लागला आणि वाद इतका वाढला की, मनोज मुंतशीर यांच्यावर लोक हल्लाबोल करू लागले आहेत. सोशल मीडियावर मनोज मुंतशीर यांच्या विरोधात ट्विट होऊ लागले आहेत. यानंतर लेखक मनोज मुनतशीर यांनी आपल्या जीवाला धोका असून मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवावी, असे म्हटले होते.







