
दरम्यान, उपोषण स्थळी मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले आहे. त्यांनी मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे. त्यांनी त्यांना पाणी प्यावे असा आग्रह धरला आहे. उपोषणस्थळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. उपोषणस्थळी नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज आले असून त्यांनी जरांगे यांना आग्रह करत पाणी पाजले. मनोज जरांगे यांनी एक ग्लास पाणी घेतले. मात्र, ते अशक्त असल्याने त्यांना पाणी देखील पायला जात नसल्याची स्थिती आहे.







