
आंदोलनाच्या पाचव्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, मला बोलता येतंय,तोपर्यंत चर्चेला या. माझा आवाज गेल्यावर नंतर येऊन उपयोग नाही. आम्ही सरकारला अडवणार नाही, आज-उद्या सरकार येत असेल तर आम्ही त्यांना संरक्षण देऊ,पण सरकारने चर्चेसाठी यावं.. असे आवाहनही जरांगे पाटलांनी केले. त्याचबरोबर माझे कुटुंब माझ्यासमोर आणू नका,कुटुबांला पाहिलं की हुंदका भरुन येतो, माणूस दोन पावले मागे येतो…” अशी भावूक प्रतिक्रियाही त्यांनी दिली.





