
रक्तदाब कमी झाल्यानंतरही उपचारासाठी नकार
दरम्यान, डॉक्टरांच्या पथकाने मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यावेळी जरांगे पाटलांचा रक्तदाब कमी झाल्याचे समजले. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीही खालावल्याने त्यांना उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, असे असतानाही जरांगे पाटील यांनी मंगळवारी उपचार घेण्यास नकार दिला. अद्याप राज्य सरकारकडून कोणालाही मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करायला पाठवण्यात आलेले नाही. सरकार आता कोणते पाऊल टाकणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





