
Manoj Jarange Patil on Lok Sabha Election Result 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फॅक्टर महत्वाचा ठरला आहे. भाजपच्या अनेक जागा यामुळे पडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे. पाटील म्हणाले, मराठ्यांचा डर निर्माण झाला, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. आता राज्य सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे. नाही तर राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघात, उमेदवार उभे करून त्यांचा कार्यक्रम करू असे जरांगे पाटील म्हणाले.




