
जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेत किमान २०० ठिकाणी तरी सत्ताधाऱ्यांचा सुपडा साफ करू. सरकारने आमच्या विरोधात अभ्यासक उतरवले आहेत. सरकारने १६ टक्के आरक्षण दिलेन्यायालयातटिकलं नाही. १३ टक्के दिलं ते पण टिकू दिलं नाही, आता १० टक्के आरक्षण दिलं, पण लागू होण्याआधीच याचिका दाखल केली आहे, मराठ्यांचे आरक्षण टिकू न देण्याचा हा कुटील डाव असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.







