
धाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचे नाव न घेता जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आंदोलकांनी कोणालाही किंमत देऊ नये.त्यांच्यासमोर आंदोलन करण्याचे आणि त्यांना भेटायची काय गरज आहे, असा सवालही त्यांनी केला. गोरगरीब जनतेशी खेळणारे हे लोक असून आरक्षण कशासाठी लागतं हे त्यांना माहिती नाही, हे पैशावर झोपणारे लोक असून यांना आरक्षणाचं काय कळणार आहे? त्यांना गोरगरिबांच्या भावना काय कळणार?ते आमच्या भावनेशी खेळत आहेत, मात्र मराठ्यांनी तसल्याला किंमत देऊ नये,कुणालाही विचारायला जाऊ नये,असं म्हणत जरांगेंनी राज ठाकरेंवर टीका केली.