
मणिपूरमध्ये घुसखोरी करून येथील सामाजिक व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही. ही लढाई तुकडे करणारे विरुद्ध एकत्र ठेवणारे यांच्यातील आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी सोमवारी मणिपूर येथे केला.
इम्फाळ : मणिपूरमध्ये घुसखोरी करून येथील सामाजिक व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही. ही लढाई तुकडे करणारे विरुद्ध एकत्र ठेवणारे यांच्यातील आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर येथे केला.
मणिपूरमधील वांशिक हिंसाचारावरून विरोधी पक्ष भाजपवर टीका करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची सभा झाली. मणिपूरमध्ये शांतता कायम ठेवण्याचा निश्चय व्यक्त करताना शहा म्हणाले, मणिपूरमध्ये घुसखोरीचे अनेक प्रयत्न होत आहेत. याद्वारे येथील सामाजिक रचना बदलण्याचा डाव आहे. मात्र, अशा लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही.









