
Maharashtra Weather Update : राज्यावर वर्षाच्या शेवटी व नवीन वर्षाच्या सुरवातीला आस्मानी संकट कोलसळणार आहे. राज्याच्या हवामानात मोठा बदल होणार असून अवकाळी पाऊस व थंडीची लाट असे दुहेरी संकट येणार आहे. यामुळे बळीराजाच्या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट विभाग, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.