
Maharashtra Weather Update : राज्यात सूर्य आग ओकत आहे. तापमानाने उच्चांक गाठला आहे. ही उष्णतेची लाट पुढील काही दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला आहे. प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना व नांदेड जिल्ह्यात ही उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात अल आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे तसेच बाहेर जातांना टोपी, रुमाल, स्कार्फ, गॉगल लाऊन बाहेर पडावे आणि सोबत पाण्याची बॉटल ठेवावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा







