
विदर्भात पिकांचे नुकसान
विदर्भात दोन दिवस झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वारे आणि गारपीटीने नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात गहू, मिरची, चणा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.