
मुंबई: उत्तरेकडे राजस्थानच्या वायव्य टोकावर स्थित पश्चिमी झंझावात व दक्षिणेत तमिळनाडू स्थित चक्रीय वाऱ्यांची स्थिती मुळे पवसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे येत्या दोन दिवसांत मुंबईसह संपूर्ण कोकण, नाशिक छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच मुळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.






