
Maharashtra Weather update : राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तापमान कमालीचे वाढले आहे. हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाल्याने कमाल – किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी राज्यात अकोल्यात सर्वांधिक ४१.५ अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली. या सोबतच वर्धा, मालेगाव, परभणी, अमरावती जिल्ह्यात देखील पारा ४१ डिग्री सेल्सिअसच्या जवळ पोहचला. या उष्णतेच्या झळा आणखी पुढील तीन-चार दिवस कायम राहण्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा







