
Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. विदर्भ मारठवड्यातील काही जिल्ह्यातील तापमान हे ४३ अंशांच्याही पुढे गेले आहे. हवामान विभागाने विदर्भात १० तारखे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विशेष करून विदर्भातील अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर नांदेड, लातूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट, वादळी वारे आणि पाऊस होण्याचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा





