
Maharashtra Weather Update: राज्यावर अवकाळी पावसाचे संकट आहे. आज पासून पुढील १७ ते १८ मे पर्यंत अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने बहुतांश जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यातील नांदेड व लातूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा







