
Maharashtra Rain News: मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात गेल्या चोवीस तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील सहा जणांसह राज्यभरात सात जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. ठाणे, पालघर, कल्याण, कोल्हापूर, पुणे, वर्धा आणि रायगड येथील नद्यांच्या काठावरील रहिवासी आणि शेतजमीन पाण्याखाली गेली.
ट्रेंडिंग न्यूज



