
ते पुढे म्हणाले, ‘मुंबईत सरकार दरबारात शेतकरी मदतीची वाट पहात आहेत. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे २५०० कोटी रुपयाची मागणी केली असल्याचं राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. परंतु सरकारकडे उधळपट्टी करण्यासाठी पैसे आहेत, शेतकऱ्यांना द्यायला नाही, असा आरोप पटोले यांनी केला. दुष्काळामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना गेले दोन दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यावर्षीचे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. दुष्काळ जाहीर करण्यातही भाजपा सरकार राजकारण करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.






