
पुणे: राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पुणे, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, पालघर, या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट तर रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात ऑरेंज देण्यात आला आहे.




