
फडणवीस म्हणले की, जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होते, तेव्हा प्रत्येक पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं जातं. सरकार स्थापन करण्याचं निमंत्रणपत्र राष्ट्रवादी पक्षालाही देण्यात आलं. यावर आम्ही सरकार स्थापन करणार नाही, असं त्यांनी पत्रात म्हटलं. हे पत्र माझ्याच घरी टाईप करण्यात आलं होतं. शरद पवारांनी त्यात काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. त्या दुरुस्त्या केल्यानंतर हे पत्र पुढे पाठवण्यात आलं. यानंतर राष्ट्रवादी राजवट लागू करण्यात आली होती, असं फडणवीस म्हणाले.



