
Election Commission of India: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून राजकीय पक्षांकडे आता फक्त चार दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे.राज्यात १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू करण्यात आली. तेव्हापासून पोलीसही अलर्ट मोडवर आहेत. राज्यात आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली, यात रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तू यासह विविध गोष्टींचा समावेश आहे.