
चित्रपटाच्या इतर बाजू कशा आहेत?
‘महाराज’मध्ये हाणामारीचा एकही सीन नाही. ही संपूर्ण कथा एका कोर्ट केसवर आधारित आहे. पण, स्नेहा देसाई आणि विपुल मेहता यांनी लिहिलेल्या या चित्रपटाच्या पटकथेत ड्रामा, इमोशनसोबतच कॉमेडी आणि रोमान्सचाही वापर करण्यात आला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, सिद्धार्थ पी मल्होत्राचा हा चित्रपट दमदार संवादांमुळे लक्षात राहतो. ‘मजदूर हड़ताल पर जा सकते हैं, ईश्वर नहीं’, ‘जन्म से वैष्णव हूं, कर्म से ब्राह्मण, स्वभाव से क्षत्रिय हूं, और ध्येय है मेरा क्षुद्र का, इसलिए जहां भी गंदगी देखता हूं, वहां साफ करने की कोशिश करता हूं’, ‘सवाल न पूछे वो भक्त अधूरा और जवाब न दे सके वो धर्म अधूरा’ असे अनेक दमदार संवाद लक्षात रहाणारे आहेत. या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी ‘महाराज’ हा चित्रपट एकदा आवर्जून बघायलाच हवा.








