
जर देशात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातील ४८ पैकी २० जागांवर भाजपचा विजय होईल असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे. भाजपनंतर काँग्रेसला ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटला फक्त २ जागा तर शिवसेना ठाकरे गटाला ११ जागा मिळू शकतील. शिवसेनेला गेल्या निवडणुकीपेक्षा पाच जागा कमी मिळणार आहे. राष्ट्रवादीत अजित पवार गटाला फक्त २ तर शरद पवार गटाला ४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजे अजित पवार गटाला काका भारी पडणार आहेत.
या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक २० जागा मिळत असल्या तरी त्यांच्या जागा तीन ने कमी होणार आहेत. तसेच राज्यात शिंदे गट व अजित पवार गटाला सोबत घेऊनही महायुतीला केवळ २४ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीलाही २४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.






