
काही दिवसांपूर्वी दोघींनी आपण एकमेकींच्या मैत्रिणी असल्याचे म्हटले आहे. यावेळी शर्लिन चोप्राला विचारण्यात आले की, तिची आणि राखीची मैत्री कशी झाली? तेव्हा शर्लिनने सांगितले की, राखीसोबत तिचे कधीही त्यांचे वैयक्तिक वैर नव्हते. मात्र, जेव्हा जेव्हा ती एखाद्या आरोपीविरुद्ध आवाज उठवायची, तेव्हा तेव्हा राखी तिच्या समोर यायची. शर्लिन पुढे म्हणाली की, जेव्हाही तिने साजिद खानच्या विरोधात आवाज उठवला, तेव्हा राखी त्याच्या बाजूने बोलायची.