
दुसरीकडे, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे प्रमुख सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी या प्रकरणाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन केले. कारण गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी-चौथी वेळ आहे, जेव्हा अशाप्रकारे बिबट्याने सेटवर एन्ट्री घेतली आहे. जंगली प्राणी सेटवर शिरकाव केल्याने सगळ्यांच्याच जीवाला धोका निर्माण झाला आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सेटवर बिबट्याने प्रवेश केला तेव्हा तेथे २०० हून अधिक लोक उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले. ही बाब सरकार गांभीर्याने घेत नसल्याचे सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी म्हटले आहे. या आधी १८ जुलैलाही मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये बिबट्या फिरताना दिसला होता.






