
पुढे ते म्हणाले, ‘लक्ष्याने लहानपणापासूनच कोणाचे ऐकले नाही. मी देखील त्याला कधी सांगू शकलो नाही, तू ह्या गोष्टींपासून लांब रहा. जेव्हापासून तो सुपरस्टार झाला तेव्हा त्याचे एक आयुष्य सुरु झाले. पण त्यापासून लांब जाण्यासाठी त्याला अध्यात्मची गरज होती. लक्ष्याने कायम त्याला जे हवे तेच केले. त्यामुळे जर त्याने कोणाचं तरी ऐकायला हवं होतं. त्यामुळे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत आहे की, एक भाऊ म्हणून एक मित्र म्हणून मी त्याच्या त्या काळामध्ये काहीच करु शकलो नाही. जे त्याच्यासाठी महत्त्वाचं माध्यम होतं शरीर हेच त्यानं संपवलं आणि स्वत:लाही. पण याची जाणीव त्याला अगदी शेवटाला झाली. तो माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडून एका गंभीर विषयावर नाटक लिहून घेतलं. सर आली धावून हे त्याच्या शेवटच्या काळातलं नाटक.’







