
लता मंगेशकर यांच्या बायोग्राफीमध्ये हा किस्सा सांगण्यात आला आहे. यात त्यांनी म्हटले की, लतादिदींनी पहिले स्वप्न जे पहिले ते देशसेवेचे होते. आपल्या हातून भरपूर समाजकार्य घडावं, असा निश्चय लता मंगेशकर यांनी केला होता. आपल्या मनातील हा विचार त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडे बोलून दाखवला होता. समाजसेवा करण्यासाठी आपण राजकारणाचा मार्ग स्वीकारणार, असे लता मंगेशकर म्हणाल्या होत्या. मात्र, त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला. त्यांनी लतादिदींना म्हटलं की, ‘तुझ्या वडीलांचं संगीत क्षेत्रात खूप मोठं नाव आहे. ते या माध्यमातून देश सेवाच करत आहेत. तू देखील त्यांच्याप्रमाणेच संगीताच्या माध्यमातून समाज सेवा करायला हवीस.’







